राजा मिडास आणि सोनेरी स्पर्श
एकेकाळी मिडास नावाचा ग्रीक राजा होता.तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे भरपूर सोने होते. त्याला एक मुलगी होती, जिच्यावर त्याचे खूप प्रेम होते.एके दिवशी, त्याला एक परी भेटली,तिला मदतीची गरज होती.त्यानेतिला मदत केली.परी खूश झाली आणि त्या बदल्यात तिने राजास एक इच्छा मागण्यास सांगितले की जी ती परी पूर्ण करणार होती. मिडासने इच्छा मागितली की त्याने स्पर्श केलेल्या प्रत्येक गोष्टीचे सोने झाले पाहिजे. त्याची इच्छा परीने पूर्ण केली.घरी जाताना त्याने खडकांना आणि झाडांना स्पर्श केला आणि ते सोन्यात बदलले.घरी पोहोचताच त्याने उत्साहाच्या भरात आपल्या मुलीला मिठी मारली, जी सोन्यात बदलली.मिडास दु:खी झाला आणि तो चांगलाच धडा शिकला. नंतर त्याने त्या प्रतीचे पुन्हा आवाहन केले.परी परत प्रगट झाली,तेव्हा त्याने परीला हात जोडून विनंती केली की मला दिलेला वर तु काढून घे,परंतु माझी मुलगी मला जीवंत करुन दे.परीने राजांचे म्हणने कबूल केले आणि आकाशात उडून गेली.
कथेचा बोध:-
अति लोभ केव्हाही वाईट असतो.लोभ तुमच्यासाठी चांगले नाही. आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी समाधानी आणि समाधानी रहा.